जामखेड : २१ दिवस होऊनही स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये अडकलेले पैशे मिळण्यासाठी स्टेट बँकेकडून पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात येते आहे. खुरदैठण येथील सेवक दशरथ डूचे यांचे जामखेड येथील स्टेट बँकेत खाते आहे. त्यांनी २१ जानेवारीला तहसील कार्यालयाजवळील स्टेट बँकेच्या एटीएम मधून १० हजार रुपये काढले. मात्र एटीएम मधून पैसेच बाहेर आले नाहीत.
त्यामुळे डूचे यांनी तात्काळ स्टेट बँकेत जाऊन अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. मात्र अधिकाऱ्यांनी ऑनलाईन तक्रार करण्यास सांगितले. डूचे यांनी ऑनलाईन तक्रार करूनही त्यांना पैशे मिळाले नाहीत. स्टेट बँकेचे अधिकारी नागरिकांचे कामे अडवून ठेवत असल्याच्या अनेक तक्रारी वरिष्ठ पातळीवर करण्यात आल्या आहेत. मात्र तक्रारीची कोणीही दाखल घेतली बँक अधिकाऱ्यांनी घेतली नाही.
याविषयी आरबीआयचे नियम
मे 2011 मध्ये आरबीआयने तयार केलेल्या नियमांनुसार, अशा प्रकारची तक्रार बँकेत आल्यास बँकेचे त्या दिवसाचे कामकाज संपण्याआधी ग्राहकाच्या खात्यात पैसे जमा करावे आसा भारतीय रिझर्व्ह बँकेचा नियम आहे. मात्र असा नियम असताना देखील जामखेड येथील स्टेट बँकेचे अधिकारी जाणीवपूर्वक सर्व सामान्य नागरिकांची अडवणूक करत आहेत.