कोल्हापूर – महाराष्ट्रातील शेतक-यांना दिवसा वीज मिळावी. या मागणीसाठी २२ तारखेपासून बेमुदत आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी करत आहे. गेल्या ५ दिवसापासून शेतीपंपास दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी कोल्हापूरच्या महावितरण समोर बेमुदत धरणे आंदोलनात सुरु आहे.
या मागण्यांसाठी अनेकदा शेतक-यांकडून अनोख आंदोलन केल्याचं पाहायला मिळतं. परंतु आज इचलकरंजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या टेबलवर साप सोडले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे महावितरण ऑफिसमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
ही घटना ताजी असतांनाच या मागणीसाठी एका शेतकरी पुत्राने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी चक्क स्वत:च्या रक्ताने पत्र लिहिले आहे. या पत्रात लिहिण्यात आले आहे की, ‘गेली पाच-सहा दिवस राजू शेट्टी कोल्हापूर महावितरण कार्यालयाच्या बाहेर याबाबत आंदोलन करत आहेत. त्याची दखल घेतली नाही. शेतकरी पुत्र म्हणून मी माझ्या रक्ताने या पत्राद्वारे विनंती करतो की, शेतकऱ्याला दिवसा दहा तास वीज मिळावी.” असे पत्रात लिहिलेला आहे सध्या हे पत्र सोशलवर चांगलेच व्हायरल होत आहे.
महाराष्ट्रातील शेतक-यांना दिवसा वीज मिळावी. यासाठी आता शेतकरी आक्रमक होतांना दिसत आहे. ग्रामीण भागात शेतीसाठी रात्री लाईट दिली जाते, ती लाईट दिवसा मिळावी ही तिथल्या शेतक-यांची मागणी केली आहे.