नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे भाड्यात सवलत देण्याची मागणी केली आहे. सीएम केजरीवाल म्हणाले की, देशातील ज्येष्ठ नागरिकांना गेल्या अनेक रेल्वे भाड्यात 50 टक्के सवलत मिळत आहे. याचा लाभ देशातील कोट्यवधी ज्येष्ठ घेत होते.
कोविड महामारीपूर्वी रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात सवलत दिली होती. कोविडपूर्वी, भारतीय रेल्वे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांना भाड्यात 40 टक्के सवलत आणि 58 वर्षे पूर्ण केलेल्या महिलांना भाड्यात 50 टक्के सवलत देत असे. ही सवलत मेल/एक्स्प्रेस/राजधानी/शताब्दी/दुरांतो ग्रुप ट्रेन्सच्या सर्व वर्गांच्या भाड्यात दिली जायची, पण ही सुविधा 20 मार्च 2020 रोजी बंद करण्यात आली.
यावरूनच आता अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारला पत्र लिहिले आहे. या पत्रात केजरीवाल यांनी भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे. आपल्या पत्रात ते म्हणतात,”ही पैशाची बाब नसून,नीतिमत्तेबाबत आहे”.
Delhi CM Arvind Kejriwal writes a letter to PM Modi regarding giving concessions to senior citizens regarding the resumption of concession given to senior citizens in rail travel. pic.twitter.com/yosq83yajd
— ANI (@ANI) April 3, 2023
अरविंद केजरीवाल म्हणतात,”जर दिल्ली सरकारने आपल्या 70,000 कोटींच्या बजेटपैकी 50 कोटी रुपये तीर्थयात्रेवर खर्च करत असेल तर दिल्ली सरकार गरीब होत नाही. येत्या वर्षभरात केंद्र सरकार 45 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. यामध्ये केवळ 1600 कोटी वृद्धांच्या रेल्वे प्रवासावर खर्च होणार आहेत. ही रक्कम समुद्रातील एका थेंबासारखी आहे, त्यामुळे हा खर्च न करून केंद्र सरकार श्रीमंत होणार नाही, किंवा हा खर्च करून केंद्र सरकार गरीबही होणार नाही.”