श्रीनगर – लष्कराच्या तीन जवानांचा काश्मीरात जमावाच्या दगडफेकीत मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसारीत झाले आहे, तथापि भारतीय लष्कराने या दगडफेकीच्या वृत्ताचे खंडन केले आहे. या जवानांचा मृत्यू एका अपघातात झाला आहे, दगडफेकीच्या घटनांने नव्हे असा खुलासा लष्कराने केला आहे.पोलिसांनीहीं या दाव्याचा इन्कार केला आहे.
ओल्या रस्त्याच्या परिस्थितीमुळे, ड्रायव्हरचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते रस्त्यावरून घसरले त्यात हे जवान ठार झाले असून अन्य जखमी सैनिकांना शोपियानच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या अपघातातील तीन जवानांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृत्यू जमावाने केलेल्या दगडफेकीतून झाल्याचे दावे सोशल मिडीयातील पोस्टवर करण्यात येत होते. त्याच अनुषंगाने काहीं ठिकाणी बातम्याही छापून आल्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी हा खुलासा केला आहे. लोकांनी अशा खोट्या अफवा पसरवून शांततेला बाधा आणण्याचे काम करू नये असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.