नवी दिल्ली – आम आदमी पक्षाने सत्ता मिळवण्यासाठी अण्णा हजारे यांचा वापर केल्याचा आरोप केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. दिल्ली दारू धोरण प्रकरणी अरविंद केजरीवाल आज सीबीआयसमोर हजर झाले. गेल्या काही दिवसांपासून केजरीवाल आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे.
आपचे मनीष सिसोदिया जेलमध्ये गेल्यापासून अरविंद केजरीवाल यांनी आक्रमक भूमिका मांडायला सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीबाबत केजरीवालांनी भाष्य केल्यानंतर या प्रकरणाची जोरदार चर्चा देखील झाली होती.
कायदामंत्र्यांनी किरेन रिजिजू यांनी एक ट्विट देखील केले आहे. ज्यात त्यांनी काही व्हिडीओ शेअर करत केजरीवालांवर निशाणा साधला आहे. ट्विटमध्ये ते म्हणतात,”आता त्यांनी सत्ता काबीज केली आहे मला खात्री आहे की ते अण्णाजींचेही ऐकणार नाहीत. भ्रष्टाचार हे निमित्त होते, अण्णाजी आणि जनतेला मूर्ख बनविण्यासाठीचे”
अण्णाजींचा वापर फक्त सत्ता मिळविण्यासाठी झाला आणि भ्रष्टाचाराच्या नावाखाली संसाधनांची लूट झाली. रिजिजू यांनी अण्णा हजारे यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अण्णा हजारे यांनी दिल्लीच्या दारू धोरणावर टीका केली आहे.
अब उन्होंने सत्ता पर कब्जा कर लिया है मुझे यकीन है कि वह अन्ना जी की भी नहीं सुनेंगे। भ्रष्टाचार एक बहाना था अन्ना जी और जनता
को मूर्ख बनाने का।
Anna ji was used only to capture Power and to Loot the resources
in the name of corruption. pic.twitter.com/pvRCYCwdHU— Kiren Rijiju (@KirenRijiju) April 16, 2023