नगर, (प्रतिनिधी) – शहरात जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात रेशनधारकांना धान्याचे वाटप केले गेले नसून, रेशनिंगच्या धान्यात दुकानदार व काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठा काळा बाजार सुरु असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष मयुर बोचुघोळ यांनी केला आहे.
तर या प्रकरणी तातडीने चौकशी करुन दोषी अधिकारी व दुकानदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन बोचुघोळ यांनी अन्नधान्य वितरण अधिकारी यांना देण्यात आले.
जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांमध्ये धान्य वाटपाची टक्केवारी खूप कमी होती. या पुढील महिन्यात हे अचानक वाढून टक्केवारी मध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. दोन महिन्यांमध्ये वाटप कमी झाले असून, अचानक एवढे लोक धान्य घेऊन का गेले नाहीत? याची चौकशी संबंधित अधिकाऱ्यांनी करण्याची गरज आहे. तसेच रेशनिंग धान्याच्या वाटपात मोठी अनागोंदी असल्याचे बोचुघोळ यांनी म्हंटले आहे.