आळंदी – देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमीत्ताने संपूर्ण देशभरात हा स्वातंत्र्य दिवस “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” म्हणून साजरा करण्याचे योजिले आहे. या महोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून “हर घर तिरंगा” या उपक्रमाअंतर्गत श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेतीलल विद्यार्थी, शिक्षकांनी आळंदी नगरीत प्रभातफेरी काढून जनजागृती केली.
प्रभातफेरीवेळी विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर घोषणा देत या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी निमित्ताने प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यासाठी जनजागृती करण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, विद्यालयाचे प्राचार्य दिपक मुंगसे, उपप्राचार्य सुर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अशोक बनकर, प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक प्रदीप काळे यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.