आळंदी, पुणे – श्री ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी येथील १९८८ – १९८९ या शैक्षणिक सत्रातील इयत्ता दहावीतील विद्यार्थी तब्बल ३२ वर्षानंतर स्नेह मेळाव्या निमित्त एकत्र आले. यावेळी आमदार महेश लांडगे, हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी सद्दिच्छा भेट देऊन स्नेहमेळाव्यात उत्साह वाढविला. त्यांनी आपल्या हाहृदयस्पर्शी, मंत्रमुग्ध करणा-या वाणीतून मैत्री या विषयावर आधारित मार्गदर्शन करून उपस्थिताची मने जिंकली.
या स्नेह मेळाव्यास डॉ. अरविंद जोशी, डॉ. बालाजी सुरवसे, शिक्षणाधिकारी राणी रंधवे, माजी नगरसेवक राजेंद्र गिलबिले, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर गावडे, उद्योजक ज्ञानेश्वर वाघमारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ चाफळे, मच्छिन्द्र सुर्वे, सुनील लष्करे, पत्रकार अर्जुन मेदनकर, मनीषा पिंपरकर, शिल्पा शहा, माधवी रंधवे, संतोष ठाकूर, सुधीर गावडे, शारदा खांडेभराड, ज्योती बोरुंदीया, कर सल्लागार महेश बोरुंदीया, प्रवीण थोरात, सतीश शेलार, संभाजी पगडे, हमीद शेख, तुकाराम जोगदंड, निशा ठाकूर, मारुती बवले, रामदास गोडसे, शंकर जाचक, जया चोपडा, कांचन गुंजाळ, लीला थोरवे, निशा भंडारी, वैशाली घाडगे, प्रेरणा गांधी,संजय पगडे,प्रमोद बाफना, पुष्पक कुलकर्णी, राजेंद्र भोसले, ज्ञानेश तापकीर, शिवाजी भोसले, सुमन गोपाळे, इंदिरा काळे, विनोद उगले, विश्वनाथ नेटके, कैलास कुऱ्हाडे, कृष्णा शिंदे, सुधीर कुऱ्हाडे, रमाकांत निळे, हनुमंत धायरकर, संपत गावडे आदी उपस्थित होते.
२०१५ मध्ये राणी रंधवे, जनार्धन सोनवणे यांनी वर्ग मित्रांचा व्हाट्सअप ग्रुप तयार केला . या ग्रुपच्या माध्यमातून संपर्क करून सर्वांना एकत्र आणण्याचे प्रभावी काम झाले. ३२ वर्षानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात माजी विद्यार्थी एकत्र येऊन गेट-टुगेदर चा कार्यक्रम यशस्वी केला. यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांचा विद्यार्थी परिचय, मनोगत, मार्गदर्शन, गवळण, जुने गीत गायन सादरीकरण, शालेय जीवनातील अनुभव मनमोकळ्या गपा गोष्टी, शालेय जीवनापासून ते आज पर्यंतचा प्रवास, प्रगती, कौटुंबिक माहिती शेअर करीत सर्व मित्रांनी एकमेकांशी संवाद साधला.
दरम्यान वाचन संस्कृतीचे जतन करण्यासाठी राणी रंधवे आणि अर्जुन मेदनकर यांनी उपस्थित सर्व मित्र, मैत्रिणींना पुस्तके भेट देत संवाद साधला. यावेळी दत्तात्रय म्हस्के यांनी गवळण, मच्छिन्द्र सुर्वे यांनी जुनी गाणी सादर करीत गेटटुगेदर मध्ये उत्साहात रंगात आणली. राणी रंधवे यांचेसह अनेक मित्र-मैत्रिणींनी या वेळी कविता सादर करीत उत्साह वाढविला.
या गेट टुगेदर मध्ये सहभागी तत्कालीन मित्र- मैत्रिणी माजी विद्यार्थी हे आताचे डॉक्टर, शिक्षक, वकील, उद्योजक, इंजिनियर, डेव्हलपर्स, पत्रकार, शिक्षणाधिकारी,पोलीस अधिकारी, व्यावसायिक,गृहिणी, लेखक,कवी, शासकीय,अशासकीय संस्थेत नोकरी व्यवसाय, व्यापारी, संस्थांचे पदाधिकारी, गुणवंत नागरिक म्हणून विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. आपापल्या क्षेत्रात कार्यरत राहून समाजाची, देशाची सेवा करीत असल्याने एक यशस्वी बॅच म्हणून ओळखली जाते.
स्नेहमेळाव्यासाठी राणी आणि जनार्धन यांनी परिश्रम घेतले. त्यांना सर्व मित्रांनी सहकार्य केले. दर वर्षी गेट टुगेदर आणि सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी आपापला परिचय करून देत संवाद साधला. स्नेह मेळाव्याची सांगता सामूहिक पसायदानाने झाली.