प्रतापगड – समाजवादीपक्षाचे प्रमुख अखिलेश यादव हे अमेठीत राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होतील अशी अपेक्षा आहे असे कॉंग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
या आधीच अखिलेश यांना यात्रेचे निमंत्रण पाठवण्यात आले असून ते त्यांनी स्वीकारले आहे असेही जयराम रमेश यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेस आणि समाजवादीपक्षाच्या लोकसभा जागा वाटपाच्या संबंधातीलबोलणी अजून अपुर्ण आहेत.
ती बोलणी त्वरीत पुर्ण करावीत अन्यथा समाजवादी पक्ष या यात्रेत सहभागी होणार नाही असा इशारा समाजवादी पक्षाच्यावतीने देण्यात आला आहे असे वृत्त प्रसारीत झाले आहे, त्या अनुषंगाने जयराम रमेश यांनी हे वक्तव्य केले आहे.
भारत जोडो न्याय यात्रेचा आज ३७ वा दिवस आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी बाबूगंजमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत अशी माहितीही रमेश यांनी दिली.