मुंबई -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजप कडून निषेध आंदोलन केला जात आहे असून छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, अशा आशयाचे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले होते. यावरून भाजप नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
याच मुद्यावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देतांना अजित पवार यांचं हे विधान द्रोहच म्हटलं आहे. यावर आता प्रतिक्रिया देतांना अजित पवार यांनी थेट फडणवीस यांना खुलं आव्हानच दिलं आहे.
अजित पवार पत्रकारांशी बोलतांना म्हणाले,’माझं विधान जर तुम्हाला द्रोह वाटतं तर केसेस दाखल करा ना. तुमच्या हातात सत्ता आहे. करा केसेस दाखल, असं ओपन चॅलेंजच पवार यांनी दिलं आहे.
ते पुढे म्हणाले,’माझं विधान द्रोह आहे की नाही याबाबत त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या हातात सत्ता आहे ना. तुम्हाला जर द्रोह वाटतो तर केसेस दाखल करा, असं आव्हान देतानाच पण ही केस नियमात बसते का? असा चिमटा अजित पवार यांनी फडणवीसांना काढला.