ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाचा आज 13 वा वाढदिवस आहे. 2007 साली आजच्याच दिवशी त्यांचे लग्न झाले होते. लग्न झाल्यावर ऐश्वर्याने टप्प्याटप्प्याने ऍक्टिंगपासून दूर जायला सुरुवात केली. गेल्या कित्येक वर्षात ऐश्वर्याने कोणत्याही नवीन सिनेमामध्ये काम केलेले नाही. आता तर ती ऍक्टिंगचे क्षेत्रच सोडून देण्याचा विचार करते आहे. वेगळे काही करायची आपली इच्छा असल्याचे सूतोवाच ऐश्वर्याने यापूर्वीच केले आहे.
तिला सिनेमाचे डायरेक्शन करण्यात जास्त रस आहे. मात्र, अद्याप दिग्दर्शनासाठी आवश्यक असलेला अभ्यास, लेखन, वाचनासाठी जेवढा वेळ द्यायला पाहिजे, तेवढा अद्याप ऐश्वर्याने दिलेला नाही. तिला याबाबत थोडे गांभीर्याने विचार करायला लागणार आहे. आपण निर्मिती किंवा दिग्दर्शन करावे, याबाबत अनेक सहकारी वारंवार आपल्याला विचारत असतात.
ऍक्टिंगबाबत बोलायचे तर संजय लिला भन्साळींच्या आगामी सिनेमामध्ये ऐश्वर्या दिसण्याची शक्यता आहे. हा सिनेमा शायर, कवी, गीतकार, लेखक साहीर लुधियानवी यांचा बायोपिक असणार आहे. या सिनेमात ऐश्वर्याबरोबर अभिषेकनेही काम करावे, असा भन्साळींचा प्रयत्न आहे.