संगमनेर भारत हा कृषीप्रधान देश असून शेती व पशुपालन हे महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय आहेत. काळानुरुप वारंवार जमिनीत रासायनिक खतांचा वापर सुरू झाल्याने मृदा संधारण व संरक्षण ही काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांंनी केले. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला.
यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर कृषी अधिकारी आत्मा प्रकल्पाचे वैभव कानवडे व मंडळ कृषी अधिकारी पंकज कवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.प्रवीण गोसावी यांनी माती परीक्षणाचे महत्व व जमीन आरोग्य पत्रिकेची आवश्यकता याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याच बरोबर जमिनीचे आरोग्य जपण्याचे व सुपीकता वाढवण्याचे आवाहन भावी शेती संवर्धकांस केले.नोडल अधिकारी बाचकर यांनी मृदा संवर्धन करण्याचे महत्व विद्यार्थीना पटवून दिले.