श्रीगोंदा – गोवंश हत्येवर बंदी असतानाही त्या उद्देशाने गोवंशाची वाहतूक करताना दोन वाहने पकडण्यात आली. या प्रकरणी श्रीगोंदा व बेलवंडी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, ४० हजार रुपयांच्या गोवंशाची सुटका करण्यात आली आहे.
याबाबत बेलवंडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात गोवंश हत्याबंदी असताना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गव्हाणवाडी परिसरातून जर्सी गाय, तसेच लहान वासरे कतलीसाठी कर्जत परिसरात घेऊन जाणार असल्याची माहिती पुणे जिल्ह्यातील गोरक्षकांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलिसांना माहिती देत गव्हाणवाडी परिसरातून जर्सी गाय, तसेच लहान वासरांना घेऊन जाणाऱ्या दोन पीक अप गोरक्षकांनी अडवत त्यातील १८ हजार रुपये किमतीचे जर्सी गायीचे लहान-मोठे वासरे, तसेच दोन पीकअप पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात गौरव रमेश शिंदे (रा. कासारवाडी, पुणे) यांच्या फिर्यादीवरून इरफान इस्माईल सय्यद (रा. कर्जत), जम्या (पुर्ण नाव माहीत नाही, रा. कर्जत), तौशिक रियाज कुरेशी (रा. करमाळा, जि. सोलापूर), कुंदन राजेंद्र घोडके (रा. गांधीनगर, ता. कर्जत) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या प्रकरणात श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काष्टी येथील श्रीगोंदा चौकात काल (शुक्रवार) रात्री ९च्या सुमारास पुणे जिल्ह्यातील गोरक्षकांनी पीकअप अडवत त्यातील २२ हजार रुपये किमतीचे जर्सी गायीचे काळया पांढऱ्या, तांबड्या रंगाचे वासरे ताब्यात घेत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आणून अहोरेश्वर जगन्माच जगताप (रा. वरवंड, ता. दौड) यांच्या फिर्यादीवरून साहोल अनिल सापकर, ओंकार दशरथ सायकर, सोहम यशवंत टिळे (तिघे रा. राहू पिंपळगाव, ता. दौंड), आतीक कुरेशी (रा. श्रीगोंदा) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला