जामखेड – अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर व्हावं हि सर्वांची इच्छा आहे, त्यानुसार अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होळकर करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. या ऐतिहासीक सोहळ्याचे आम्ही मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साक्षीदार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जामखेड मधील चोंडी येथे सांगितले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त चोंडी येथे अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे.
अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होळकर देण्याचा निर्णय आमच्या कार्यकाळात झाला आहे याचा आम्हाला गर्व आहे. त्यामुळेच राज्य सरकारने अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्याचे ठरविले असून येत्या काही दिवसात अहमदनगरचे नामकरण अहिल्यानगर होळकर करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जामखेड येथील चोंडीत केली आहे.