मुंबई – जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीनंतर आता राज्यात लक्ष देणार असून राज्यातही भाजपची सत्ता आणणार, असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला. राज्य सरकारची लायकी फक्त पोस्टर्स लावण्यापुरती आहे. आम्हाला मुख्यमंत्री भाजपचा हवाय, “लगान’ची टीम नको असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.
जिल्हा बॅंक निवडणुकीतील विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावर आता नवाब मलिक यांनी प्रतिउत्तर दिल आहे. ते म्हणाले,’अपहरण करणे, पैसे देणे आणि त्याच्यातून एखादी बँक जिंकल्यानंतर आता ते राज्य जिंकण्याचं आव्हान देताहेत. जिल्हा बँक जिंकल्यानंतर हे आम्ही महाराष्ट्र जिंकू, सत्ता परिवर्तन करू असे दावे करताहेत. ठीक आहे गल्ली क्रिकेटमध्ये जिंकल्यानंतर वर्ल्डकप जिंकणार असं बोलण्यासारखं आहे. भाजपवाले स्वप्न बघताहेत. आता त्यात आणखी एक व्यक्तीची भर पडली आहे. त्यांना शुभेच्छा..! असं म्हणत मालिकांनी राणेंना टोला लगावला आहे.
ते पुढे म्हणाले,’नारायण राणे हे अजित पवार कोण असं विचारताहेत. त्यांनी अजित पवारांना ओळखण्याची गजर नाही. संपूर्ण राज्य, देशाला अजित पवार कोण हे माहिती आहे.’ असं म्हणत राणेंवर मालिकांनी खोचक टीका केली आहे.