नवी दिल्ली – अदानी गैरव्यवहार प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून उत्तर मागण्यासाठी भारतीय युवक कॉंग्रेसने देशव्यापी घरोघरी पोस्टकार्ड मोहीम सुरू केली आहे. त्याद्वारे ते तीन प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून उत्तर मागणार आहेत.
यातील एक प्रश्न असा आहे की, “अदानींनी भाजपला किती निधी दिला? अन्य दोन प्रश्न अदानी विषयाशीच संबंधीत आहेत. युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि संघटनेचे दिल्लीचे प्रभारी कोको पाधी म्हणाले, की ही मोहीम देशभरात सुरू करण्यात आली आहे.
आम्ही लोकांकडून पोस्ट कार्डावर हे प्रश्न लिहून घेऊ आणि ती पोस्ट कार्डे नंतर पंतप्रधानांना पाठवू. अदानी प्रकरणात सरकार उत्तर देण्यास सतत टाळाटाळ करीत असल्याने लोकांमार्फतच हे प्रश्न पंतप्रधानांना विचारण्याचा या मोहीमेचा उद्देश आहे.