नवी दिल्ली – अदानी समूहातील अदानी पावर या कंपनीला तिसऱ्या तिमाहीत केवळ 9 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहित कंपनीला 218 कोटी रुपयांचा नफा झाला होता. त्या तुलनेत या तिमाहीमध्ये 96% घट झाली आहे. या तिमाहीत कंपनीला महाग कोळसा आयात करावा लागला. त्याचबरोबर वीज निर्मिती कमी झाली.
यामुळे कंपनीच्या नफ्यावर परिणाम झाला असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल सारदांना यांनी सांगितले. भारतातील ऊर्जा क्षेत्राची गरज वाढणार आहे. त्यामुळे आगामी काळात कंपनीची उलाढाल वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
अदानी विल्मर कंपनीचा नफा वाढला
खाद्य तेल क्षेत्रात कार्यरत असलेल्या अदानी विल्मर कंपनीचा नफा तिसऱ्या तिमाही 16 टक्क्यांनी वाढून 246 कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी या तिमाहित कंपनीला 211 कोटी रुपयांचा नफा झाला होता. या तिमाहीत कंपनीची उलाढाल 15,515 कोटी रुपये झाली आहे . खाद्य तेलाशिवाय अदानी विल्मर तांदूळ, पीठ, साखर, बेसन, खिचडी इत्यादी क्षेत्रात कार्यरत आहे. या ताळेबंदाबाबत आम्ही समाधानी आहोत असे अदानी विल्मर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अंगशू मलिक यांनी सांगितले.