मुंबई- असं म्हणतात कि लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असंच काहीसं आसावरी आणि अभिजित सोबत घडताना दिसतंय आणि या दोघांमधला दुवा ठरलेय ती शुभ्रा. सोहम वाईट वागून देखील आसावरीच्या प्रेमाखातर आणि आदराखातर अभिजित सगळी प्रॉपर्टी सोहम च्या नावाने करून दोघे एका चाळीत राहिला जातात. दोघांनीही त्यांच्या सुखी प्रवासाला सुरुवात केलेय. अभिजित ने सुरु केलेल्या नवीन पावभाजीच्या गाडीची चर्चादेखील होतेय आणि त्यामुळे सोहम चा जळफळाट होतोय.
आता ह्याच प्रवासात आणखी एक योगायोग घडत आहे, अभिजित आणि आसावरी या दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी आहे, म्हणून अभिजितने आसावरीसाठी एक surprise प्लॅन केल आहे, तो चाळीतल्या लोकांना बोलावून आता हीच आपली फॅमिली आहे अस सांगत संपूर्ण चाळी ला लायटींग करतो आणि अभिजित आसावरी चाळीतल्या या नवीन परिवारासोबत केक कापून वाढदिवस साजरा करतात.