मुंबई – सुपरस्टार आमीर खान आता तिसऱ्यांदा दुल्हा बनण्याच्या तयारीत आहे. काही महिन्यांपूवीच आमीर खानने पत्नी किरण रावला घटस्फोट दिला आहे. आम्ही दोघेही पती-पत्नी नाही. मात्र एकत्र पालक म्हणून कायम राहणार आहोत, असे या दोघांनी एक निवेदन जाहीर केले होते. आमिरने आपल्या तिसऱ्या लग्नाची अद्याप घोषणा केलेली नाही.
मात्र आगामी “लालसिंग चढ्ढा’च्या रिलीजनंतर तो ही घोषणा करण्याची शक्यता आहे. म्हणजे त्योचे लग्न नक्की कोणाशी होणार आहे, हे पुढच्या वर्षी एप्रिलनंतरच समजू शकेल. आमीर आणि किरण रावच्या घटस्फोटाला फातिमा शेख जबाबदार असल्याचे मानले जात होते.
म्हणून तिला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले होते. त्या दोघांमध्ये रिलेशनशीप असल्याची अफवाही पसरली होती. आमीरने 1987 मध्ये रिना दत्ता बरोबर लग्न केले होते. 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आमीरने किरण रावबरोबर लग्न केले होते.