नवी दिल्ली – जिल्ह्यातील निर्माणाधीन बोगद्यात अपघात (accident in tubal) झाल्याचे समोर आले आहे. यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर (yamunotri Nantion Highway) निर्माणाधीन बोगद्याचा तब्बल 50 मिटरपर्यतचा भाग कोसळला असून त्यात 36 कामगार अडकले आहेत. या घटनेनंतर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले असून बोगद्यात अडकलेल्या कामगारांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांना पाइपच्या साहाय्याने ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.
डीजीपी अशोक कुमार (dgp Ashok Kumar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासन, एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे पथक (serf and ndrf) घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. मात्र, बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी दोन ते तीन दिवस लागू शकतात. कामगारांना वाचवण्यासाठी तांत्रिक तज्ज्ञांचे मतही घेतले जात आहे. सिल्क्यरा ते दंडलगाव या नवयुग कंपनीच्या बांधकामाधीन बोगदा कोसळल्यानंतर अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि एसडीआरएफचे बचाव पथक रवाना करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बांधकाम सुरू असलेला बोगदा कोसळल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनही सतर्कतेच्या मार्गावर आले आहे. बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याला तडे गेल्याने सुमारे 36 कामगार अडकले आहेत. सिल्क्यराकडे 200 मीटर पुढे ढिगारा आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात काम करणारे सर्व मजूर 800 मीटर अंतरावर अडकले आहेत.
बोगद्याच्या बाहेर पाच रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत, जेणेकरून मजुरांना बाहेर काढल्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात नेता येईल. तसेच त्यांच्यावर प्राथमिक उपचार करता यावेत यासाठी वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे.
तसेच बोगद्यात अडकलेल्या कामगारांना ऑक्सिजन पाइपद्वारे ऑक्सिजन दिला जात आहे. सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. घटनेची माहिती मिळताच जिल्हा मुख्यालयातून मदत आणि बचाव पथके अपघातस्थळी रवाना करण्यात आली. सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.