मोशी, शिवाजीवाडी, ऑस्टीया सिटीत मतदारांच्या गाठीभेटी
मोशी – महायुतीचे सर्वाच्च नेते नरेंद्र मोदी मतदारांना गॅरंटी देत आहेत. तशी तुमची मतदारांसाठी कोणती गॅरंटी या प्रश्नावर मी लोकांसाठी उपलब्ध असणारा माणूस हीच माझी गॅरंटी असल्याचे महायुतीचे शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळऱाव यांनी मोशी दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
निवडणुकीच्या प्रचारार्थ मोशी, शिवाजीवाडी, भारतमाता चौक, ऑस्टीया सिटी या भागाचा दौरा त्यांनी केला. त्यावेळी महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी त्यांच्या सोबत होते, दौऱ्यात त्यांचे विविध भागात स्वागत करण्यात आले.
ते म्हणाले की, खासदार नसतानाही नॅशनल हायवे ॲथॉरिटीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. त्यावर नितीन गडकरींनी नियोजन केले. महामार्गाचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत. मोशी येथील श्री नागेश्वर महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नितिन सस्ते पाटील व उषाताई सस्ते पाटील, माजी नगरसेवक वसंत बोराटे, शिवसेना शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माथाडी कामगार अध्यक्ष इरफान सय्यद, भोसरी विधानसभा शहर उपाध्यक्ष अतीश बारणे,
गाडा मालक अध्यक्ष गणेश सस्ते पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा कविताताई आल्हाट, भोसरी विधानसभा अध्यक्ष उत्तम आल्हाट, उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, माजी शिक्षण मंडळ सदस्य विजू लोखंडे, कुस्तीगीर संघ अध्यक्ष पंडित मोकाशी, सोसायटी चेअरमन माणिक अल्हाट, स्वयंमच्या प्रदेशाध्यक्ष मेघाताई पवार, उद्योजक प्रकाश अल्हाट, प्रदीप आल्हाट, संदीप आल्हाट, संतोष सस्ते, सामाजिक कार्यकर्ते राघू बनकर, बबन आल्हाट, आशाताई मिसाळ, रोहिदास हवालदार, आदींसह मतदारांच्या त्यांनी भेटी घेतल्या.
कोल्हेंचे उत्तर देऊ शकतात
नगर, खेड, सोलापूर हायवेवरची वाहतूक कोंडी अद्याप सुटली नाही, यावर पत्रकारांशी बोलताना आढळराव म्हणाले, मागील वेळी खासदार असताना कोल्हे पाच वर्षांत मतदारसंघात ते फिरकले नाहीत की एक रुपयांचा निधी आणला नाही. त्यांनी कोणती कामे मार्गी लावली नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडी का सुटली नाही. त्याचे उत्तरही तेच देऊ शकतात, अशी प्रतिक्रीया आढळराव यांनी व्यक्त केली.