परिंचे -पुरंदर तालुक्यातील अतिदुर्गम अशा समजल्या जाणाऱ्या काळदरी गावांमध्ये ग्रामपंचायत लोकसहभागातून उभारलेल्या कोविड विलगीकरण कक्षामधून करोनामुक्त झालेल्या 30 रुग्णांना ग्रामपंचायत व आरोग्य केंद्राच्या वतीने गुलाबपुष्प देऊन पेढा भरवून घरी सोडण्यात आले असल्याचे सरपंच गणेश जगताप यांनी सांगितले. यावेळी ग्रामसेवक काशिपती सुतार उपस्थित होते.
वाड्यावस्त्यांवरील नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी केली त्यामध्ये 30 रुग्ण आढळले त्यांना तातडीने विलगीकरण कक्षात आणून उपचार सुरू केले, त्यामुळे त्यामुळे संक्रमणाचा धोका कमी झाला आणि स्थानिक पातळीवर उपचार करता आल्याचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक मोरे यांनी सांगितले.
यावेळी आरोग्य सेविका वनिता दुर्गाडे, आशा वर्कर्स पूनम भोसले उपस्थित होत्या. गावातील आरोग्य कर्मचारी, सरपंच गणेश जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व रुग्णांची सेवा केली. वेळेवर औषधोपचार, पोषक आहार, मनोरंजन, व्यायाम यामुळे हे 30 ही बाधित 15 दिवसांत घरी गेले.
यावेळी शैलेश यादव, प्रशांत शेंडकर, तुषार कारकर, तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकात धनावडे, शरद कारकर, विलास धनावडे, राजेंद्र कोलट, स्वागत कोंढाळकर, तुळशीराम पेटकर, विठ्ठल सणस, अशोक थोपटे, अण्णा भगत, दत्ता पेटकर, राहुल वांभिरे, सुनील जगदाळे, कुंदन यादव, ग्रामपंचायत सदस्य अशोक भगत, ग्रामपंचायत सदस्या अलका पिसाळ उपस्थित होते.