पुणे: पुढील 48 तासात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच राज्यात पुढील पाच दिवस कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
पुढील पाच दिवस कोकण आणि गोव्यात सर्वदूर पाऊस पडेल. आज शुक्रवारी आणि शनिवारी अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईमध्ये पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. पाच तारखेपर्यंत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा आहे.
मागील 24 तासांमध्ये राज्यात पाऊस सुरु असून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीत जोरदार पाऊस झाला.