नवी दिल्ली: देशातील वाढत्या करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ईशान्य विभागात येणाऱ्या राज्यांमधील स्थिती आशादायी ठरत आहे. त्या विभागातील मणिपूर, मिझोरम, नागालॅंड आणि सिक्कीम या चार राज्यांत आतापर्यंत करोना संसर्गामुळे एकही बाधित दगावलेला नाही.
करोनाबाधित आणि बळींच्या संख्येचा विचार करता देशातील इतर भागांपेक्षा ईशान्य विभागातील स्थिती तुलनेने चांगली आहे. ईशान्य विभागातील 8 राज्यांत सध्या 3 हजार 731 सक्रिय बाधित आहेत. तर त्या विभागातील 5 हजार 715 बाधित आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत.
संपूर्ण विभागात केवळ 12 करोनामृत्यूंची नोंद झाली आहे. त्या विभागात आसाममध्ये सर्वांधिक 2 हजार 279 तर मणिपूरमध्ये त्याखालोखाल 702 सक्रिय बाधित आहेत.