मृत्युमुखीनगर, दि.9 (प्रतिनिधी) -निसर्ग चक्रीवादळ व पावसाने जिल्ह्यातील एक हजार 549.46 हेक्टर शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात अहवाल जाहीर केला आहे.
अकोले तालुक्यातील 82.30 हेक्टर, संगमनेरमध्ये एक हजार 70.37, राहुरी तालुक्यात 45.99, नगर 2.38, कोपरगाव- 1.70 हेक्टर, नेवासे 4.84, पारनेर- 292.30, पाथर्डी- 12.50, श्रीगोंदा -7.40 आणि श्रीरामपूर येथे 29.68 हेक्टर शेतपिकाचे नुकसान झाले आहे.
याशिवाय, नगर आणि संगमनेर तालुक्यांत प्रत्येकी एक आणि शेवगावमध्ये दोन व्यक्ती जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अकोले तालुक्यात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. काही ठिकाणी जनावरे दगावण्याच्या घटनाही घडल्या आहेत. अकोले चार, संगमनेर सात, कोपरगाव एक, श्रीरामपूर दोन, नेवासे एक, राहाता सहा, पारनेर पाच, अशी 26 जनावरे मृत्युमुखी पडली.
तसेच या वादळात जिल्ह्यातील 32 कच्च्या घरांचे नुकसान झाले. यात, संगमनेरमध्ये सर्वाधिक 10 घरांची पडझड झाली आहे. तसेच, अकोले, कर्जतमध्ये प्रत्येकी एक, कोपरगाव-10, नेवासे दोन आणि राहुरी येथील आठ कच्च्या घरांचे नुकसान झाले आहे. तर अंशतः कच्च्या असलेल्या 749 घरांचे नुकसान झालेले आहे. यात नगर, नेवासे येथील आठ, अकोले-61, कर्जत- तीन, कोपरगाव-21, पारनेर- 44, पाथर्डी- 10,
राहुरी-17, संगमनेर-531, श्रीगोंदा-13, श्रीरामपूर-18 आणि राहाता-15 असे नुकसान झाले.
जिल्ह्याच्या विविध भागांतील आठ झोपड्यांचेही नुकसान झाले. याशिवाय 100 टक्के पक्की घरे असलेल्यांमध्ये राहुरी आणि संगमनेर येथील प्रत्येकी दोन घरांचे, तर अंशता पक्की असलेल्या घरांमध्ये अकोले- आठ, कोपरगाव -तीन, नेवासे दोन, राहुरी- पाच, संगमनेर- चार, आणि शेवगाव एक, असे एकूण 23 घरांचे नुकसान झाले.