नगर – मालवाहतूकीचे नियम शिथिल करताच नगर शहरात वाहनांची वर्दळ वाढू लागल्याने आडते बाजारात वाहनांच्या रांगा लागल्या असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे अंशत: शिथिलचा आडते बाजारात एक प्रकारे फज्जाच उडाला असल्याचे दिसत होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी दुकानदार यांना दुकाने चालू करण्यासाठी काही प्रमाणात सूट देण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी नगर शहरातील आडते बाजार, दाळमंडई भागात मोठ्या प्रमाणात रस्ते जाम झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
तब्बल एक महिना लॉकडाऊन कालावधी झाला असून अनेक नागरिक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी साठी घराबाहेर पडले आहेत. मात्र कुठलाही सोशल डिस्टन्स न पाळता वाहने रस्त्यावरच आडवे तिडवे उभे करून वाहतूकीस आडथाळा करत गर्दी केल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊनकाळात जिल्हा प्रशासनाने ज्या उद्योग- अस्थापनाना सवलती दिल्या आहेत, त्या वगळता जिल्ह्यातील कोणत्याही अस्थापना अथवा दुकाने जिल्हा प्रशासनाचे आदेश आल्याशिवाय सुरु करु नयेत असे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी आणि दुकानदारांनी याची नोंद घ्यावी तसेच विनाकारण घराबाहेर पडल्यास कारवाई केली जाणार आहे. असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.