नवी दिल्ली – कोरोना विषाणूला अटकाव करण्यासाठी देशभरामध्ये सध्या लॉक डाऊनचा दुसरा टप्पा लागू करण्यात आला आहे. लॉक डाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला सर्वाधिक फटका बसला असून नागरी वाहतुकीची सर्व साधने सध्या ठप्प आहेत.
लॉक डाऊनची मुदत येत्या ३ मे रोजी संपुष्टात येत असली तरी देशातील कोरोना संसर्ग नसलेल्या भागांमध्ये २० तारखेपासून काही प्रमाणात सूट देण्यात आलीये. याच पार्श्वभूमीवर आता सरकारतर्फे नागरी हवाई वाहतूक देखील सुरु केली जाईल अशा चर्चा सुरु आहेत. या चर्चांना पूर्णविराम देत आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हवाई वाहतुक पूर्ववत होण्याबाबचा निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट केलंय.
पत्रकारांशी संवाद साधताना जावडेकर यांनी, ‘देशांतर्गत नागरी विमान वाहतूक सेवा सुरु करण्याचा कोणताही निर्णय सरकारतर्फे घेण्यात आला असून असा निर्णय झाल्यास तुम्हाला कळवण्यात येईल.’ अशी माहिती दिली आहे.