मुंबई: राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने १०० दिवसांचा टप्पा ओलांडला असून यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या ७ मार्च रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. दरम्यान,‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अयोध्या वारी झाली की त्यांनी एकदा शेतकरी वारी करावी, अशी इच्छा आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
याच पार्श्वभूमीवर आज राज्यातील शिवसैनिकांनी राम जन्मभूमीकडे कूच केली आहे. राज्यभरातील शिवसैनिकांना घेऊन १८ डब्ब्यांची एक विशेष रेल्वेगाडी आज दुपारी मुंबईतील लोकमान्य टर्मिनसवरून आयोध्येकडे रवाना झाली असून ती उद्या सायंकाळी अयोध्येला पोहचेल. उद्धव ठाकरे यांच्या शनिवारच्या एकदिवसीय अयोध्या दौरा आटोपल्यानंतर शिवसैनिक लगेचच याच ट्रेनने परतणार आहेत.