राजगुरूनगर येथील मेळाव्यात अमर राऊत यांचे आवाहन
राजगुरूनगर- उद्योजकांनी आर्थिक स्तरीय प्राप्त करताना स्वतःबरोबर सामाजिक व आर्थिक विषमता कमी करण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे, असे आवाहन पुणे खादी ग्रामोद्योग संघाचे अधिकारी अमर राऊत यांनी येथे केले.
महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवीवर्षाचे औचित्य साधून खेड तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या वतीने रोजगार राजगुरूनगर येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी राऊत बोलत होते. यावेळी खेड तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे ज्येष्ठ संचालक शांताराम घुमटाकार, अध्यक्ष वैभव घुमटकर, उपाध्यक्षा रोहिणी भालेकर, जयंत घोरपडे, नानाभाऊ नाईकडे, अनिल कहाणे, अनिल शिंदे, अजित औटे, लक्ष्मण मोरे, नामदेव कुंभार, शोभा कानडे, नारायण कदम, बबन लाडके विष्णू बोऱ्हाडे, सचिव राजेंद्र सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या संख्येने नवउद्योजक उपस्थित होते.
वैभव घुमटकर म्हणाले की, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांनंतर्गत अनन्य साधारण अशा रोजगार निर्मितियाची क्षमता असलेल्या योजनांचा प्रसार प्रचार माध्यमातून उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. खादी ग्रामोद्योग संघाच्या माध्यमातून उद्योजकांना अर्थसहायय पुरवण्यात येते. नवीन उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी संघाच्या माध्यमातून अर्थपुरवठा केला जात असल्याने तालुक्यात अनेक उद्योजक घडले आहेत.