नवी दिल्ली : इराणमध्ये चिंतेचे वातावरण असतानाही इराणचे परराष्ट्रमंत्री जवाद झरीफ हे तीन दिवसांच्या रायसिना डायलॉग या परिषदेसाठी काल भारतात आले आहेत. ते उद्या परराष्ट्रीय व्यवहारमंत्री एस.जयशंकर यांना भेटणार आहेत.
अमेरिका आणि इराणमध्ये सध्या सुरु असलेल्या संघर्षावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. झरीफ हे मुंबईत देखील येणार आहेत आणि उद्योगपतींबरोबर चर्चा करणार आहेत.
इराणचे लष्करी अधिकारी कासिम सोलेमानी यांच्या हत्येनंतर अमेरिका आणि चीन यांच्यात तणाव वाढला असल्याच्या पार्श्वभूमीवर झरीफ यांची ही भारत भेट महत्त्वाची मानली जात आहे. हा तणाव लवकरात लवकर दूर व्हावा, अशी इच्छा भारताने व्यक्त केली आहे.