नवी दिल्ली : मागील सरकारच्या काळात झालेल्या झूंडबळींच्या घटना पाहता झारखंडमध्ये झूंडबळीविरोधी कायदा करावा, अशी मागणी मुस्लीम समाजाकडून हेमेंत सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच करण्यात आली.
ऑल इंडिया मुस्लिम मुशावरतचे अध्यक्ष नावेद हमिद म्हणाले, पठलगडी चळवळीतील कार्यकर्त्यांवर लावलेले देशद्रोहाचे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे आभार मानतो. विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात झूंडबळी रोखणारा कायदा मंजूर करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
या वर्षभरात गोहत्येच्या संशयावरून हत्या करण्याच्या तब्बल 22 घटना घडल्या आहेत. माघील वर्षी सत्तेत असणारे भाजपा सरकार या गंभीर प्रकाराकडे डोळेझाक करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप आहे. तर कॉंग्रेस याचे राजकारण करत असल्याचे भाजपाचे म्हणणे आहे.