राजगुरूनगर : भिमा कोरेगाव येथील शौर्यदिना निमित्ताने सर्वानी शांततेचे सहकार्य करावे असे आव्हान राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. १ जानेवारीला विजयी स्तंभास अभिवादन करण्यासाठी देशभरातुन लाखो भाविक येत असतात.
रिपाइं (आठवले) गटाचे पुणे जिल्हा निमंत्रक संतोषनाना डोळस यांनी राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरविरांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहावे. भिमा कोरेगाव येथे येणा-या भाविकांना महाराष्ट्र शासनाकडून सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात आदी मागण्याचे निवेदन गृहमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत दिले.
यावेळी गृहमंत्री म्हणाले, लोकांना मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यासाठी शासन कटीबध्द असून प्रशासनाला शांततेचे सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.