पुणे: नागरिकत्व विधेयकाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. आज पुण्यात सर्व धर्म सामाजीक संघटनांच्या वतीने नागरिकत्व विधेयक कायद्याच्या विरोधात बाबाजान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय विशाल मोर्चा काढण्यात आला.
नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाविरोधात ईशान्येकडच्या राज्यांमध्ये सुद्धा आजही मोठ्या प्रमाणावर विरोध प्रदर्शन सुरुच आहे. दरम्यान, आसाममध्ये मागच्या तीन दिवसापासून बिघडलेली परिस्थिती आता हळूहळू नियंत्रणात येत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात नागरित्व दुरूस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर हा हिंसचार उफाळला आहे. गुवाहाटी शहरातील परिस्थिती नियंत्रणात आली आहे.