नवी दिल्ली : नागरिकत्व कायद्यात दुरूस्ती केल्यानंतर ईशान्येत झालेला उद्रेक हळूहळू देशभर पसरू लागला आहे. त्यातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी कायद्याच्याविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. यापुर्वीच त्यांनी नागरिकत्व कायदा आणि एनआरसी राज्यात लागू होऊ देणार नाही, असे सांगितले होते. त्यांचा पवित्रा आजही कायम आहे.
WB CM: Once I was alone. Today Delhi’s CM says that he won’t allow this. Bihar’s CM says that he won’t allow NRC, I tell him don’t allow #CitizenshipAmendmentAct too. MP’s CM said that,Punjab’s CM said that,Chhattisgarh’s CM said that,Kerala’a CM said that, everyone has to say it https://t.co/7I2ppOQqaZ
— ANI (@ANI) December 16, 2019
कोलकातामध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली मार्च निघाला असून, पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली. मोदी सरकार सबक साथ सबका विकास म्हणत सत्तेवर आले पण जर सबका साथ नसेल तर सबका विकास कसा होणार असे म्हणत सरकारला इशारा दिला.
रविवारी राजधानी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात आंदोलक विद्यार्थी आणि पोलीस आमनेसामने आले. आयआयटी मुंबईसह देशातील अनेक शैक्षणिक संस्थामधून कायद्याला विरोध होऊ लागला आहे. लखनऊतील नदवा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी निदर्शनं सुरू केली. यावेळी पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यानंतर दगडफेक झाली.