नगर -नगर तालुक्यातील निंबळक हद्दीत एमआयडीसी मधील कारखाने पावसाच्या पाण्याचा फायदा घेत कंपनीत वापरण्यात येणारे रसायन निंबळक हद्दीत जाणाऱ्या ओढयामध्ये सोडले जाते. यामुळे येथील शेती नापीक झाल्या आहेत. तसेच जनावरे दगावल्याचा घटना घडत आहे.
अशा कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी पंचायत समितीचे सदस्य डॉ. दिलीप पवार यांनी प्रदुषन मंडळाकेड् केली होती. या तक्रारीची दखल घेत निंबळक हद्दीत रसायन सोडणाऱ्या कारखान्यावर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी पाटील यांनी सांगीतले.
डॉ. दिलीप पवार, शरद लामखडे, बाळासाहेब कोतकर, शिवाजी दिवटे, रावसाहेब मदने, राजू कोतकर,दत्ता धावडे व शेतकरी उपस्थित होते.