उरुळी कांचन – उरुळी कांचन, सोरतापवाडी, वळती, शिंदवणे, टिळेकरवाडी, भवरापूर, कोरेगाव मुळ परिसरातून कोल्हापूर, सांगली, सातारा, इचलकरंजीकडे आज धान्य, कपडे, बिस्किटे तसेच फळे, औषधे घेऊन टेम्पो, ट्रक रवाना झाले. उरुळी कांचन येथील अखिल तळवाडी मित्र मंडळाच्यावतीने विविध जीवनाश्यक वस्तू जमा केल्या. या वेळी ग्रामपंचायत सदस्य सुनील कांचन, जयेश कांचन, अभिषेक कांचन, बाळासाहेब शेळके, तुकाराम शितोळे, संजय टिळेकर याच्यासह पं. स. सदस्या हेमलता बडेकर, देविदास कांचन, कांतीलाल काळे यांनी गावात फिरून भाकरी, चपाती, अन्नधान्य, कपडे जमा केले.
सोरतापवाडी येथे सरपंच सुदर्शन चौधरी, उपसरपंच व भारती चौधरी, माजी सरपंच पुनम सागर, नाना चौधरी, अजिंक्य चौधरी, दिलीप शितोळे, रामदास कुंजीर, शंकर कड आदींनी कपडे, बिस्किटे तसेच फळं, औषधांची मदत कोल्हापुरकडे पाठविली. आप्पासाहेब कानकाटे, आप्पासाहेब लोणकर, मारुती चौधरी यांनी आर्थिक मदत केली. तर, राजेंद कड, बंडू गुंजाळ हे पूरग्रस्त भागात राहून सेवा बजावणार आहेत.