मुंबई : महाराष्ट्रातील पुराचा फटका हा सर्वच गोष्टींना बसत आहे. त्यात लालपरीचाही समावेश आहे. कारण पुरामुळे एटीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाडा वगळता भागात एसटीची वाहतूक पुर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे एसटीला रोज 4 ते 5 कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे. मागील दहा दिवसांपासून राज्यात पुराने थैमान घातल्यामुळे एसटीचा 50 कोटींचा महसुल बुडाला आहे.
राज्यात आलेल्या पुरामुळे एसटीचे आगार, बसस्थानके, बसेस पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे महामंडळाच्या स्थावर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, पुर पुर्णपणे ओसरल्यानंतर या मालमत्तेच्या नुकसानीचा आकडा समोर येणार आहे परंतु, सध्या तरी 50 कोटींचा आकडा हा महसुलाचा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, एसटीचा दररोज 18 हजार बसेसच्या माध्यमातून 55 लाख किमीचा प्रवास होतो. त्यातून एसटीला रोज 22 कोटींचा फायदा होतो. मात्र, मागील दहा दिवसांचा विचार केला तर एसटीला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.