Prashant Kishor on Lok Sabha। लोकसभा निवडणुकीत एकीकडे सत्ताधारी भाजपने अब कि बार ४०० पारचा नारा लगावला आहे. तर दुसरीकडे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्षाची इंडिया आघाडी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यासर्व घडामोडीत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी यंदाच्या निवडणुकीविषयी मोठे विधान केले आहे. त्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना भाजप आणि विरोधकांच्या आकड्यांचा पूर्ण लेखाजोखा मांडलाय. त्यांनी केंद्रात पुन्हा भाजपचेच सरकार स्थापन होणार असल्याचेही संकेत यातून दिले आहेत.
भाजपासाठी पूर्व व दक्षिण भारतात यश
प्रशांत किशोर यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये, भाजप यंदाच्या निवडणुकीत ३०० पेक्षा जास्त जागा जिंकू शकते. मात्र असे असले तरी मोदी किंवा राहुल गांधी दोघेही या निवडणुकीत अजेय नाहीत असेही स्पष्ट मत त्यांनी वेळी मांडलं. तसेच भाजपसाठी पूर्व व दक्षिण भारतामध्ये दिलासादायक निकाल लागण्याचा अंदाज वर्तवला आहे. “यंदाच्या निवडणुकीत प्रामुख्याने पूर्व आणि दक्षिण भारतात भाजपच्या जागा वाढतील. त्याशिवाय भाजपाला मिळणाऱ्या मतांचं प्रमाणही यावेळी वाढेल. तामिळनाडूसारख्या राज्यांमध्ये हे वाढलेल्या मतांचं प्रमाण भाजपासाठी महत्त्वाचं ठरेल. मी हे जवळपास वर्षभरापूर्वी सांगितलं आहे की यावेळी पहिल्यांदाच भाजपाला तमिळनाडूमध्ये दोनअंकी मतांची टक्केवारी गाठण्यात यश येईल”, असे त्यांनी म्हटले.
VIDEO | @ 𝟒 𝐏𝐚𝐫𝐥𝐢𝐚𝐦𝐞𝐧𝐭 𝐒𝐭𝐫𝐞𝐞𝐭: “They (BJP) will significantly add number of seats in eastern and southern India, and we would also see a huge jump in their vote share which is more important in states like Tamil Nadu. I had said this a year back that for the… pic.twitter.com/bWcKRQNtSy
— Press Trust of India (@PTI_News) April 7, 2024
तेलंगणात पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर Prashant Kishor on Lok Sabha।
दरम्यान, एकीकडे तमिळनाडूमध्ये दोनअंकी मतांची टक्केवारी भाजपासाठी मोठं यश ठरू शकतं असा दावा प्रशांत किशोर यांनी केला असताना दुसरीकडे तेलंगणामध्ये भाजपासाठी त्यांनी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचं यश अंदाजित केलं आहे. “तेलंगणामध्ये भाजपा पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर असेल. ही भारतीय जनता पक्षासाठी फार मोठी बाब असेल. ओडिसामध्ये ते नक्कीच पहिल्या क्रमांकाचा पक्ष असतील”, असं प्रशांत किशोर म्हणाले.
VIDEO | @ 𝟒 𝐏𝐚𝐫𝐥𝐢𝐚𝐦𝐞𝐧𝐭 𝐒𝐭𝐫𝐞𝐞𝐭: “There is a structural flaw in the way the party (Congress) has been structured and it functions, the way it connects with people, the way it does its outreach, the way it rewards its workers,” political strategist Prashant Kishor… pic.twitter.com/OHZL30CQtq
— Press Trust of India (@PTI_News) April 7, 2024
पश्चिम बंगालमध्ये धक्कादायक निकाल ! Prashant Kishor on Lok Sabha।
प्रशांत किशोर यांना पश्चिम बंगालचे निकाल सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारे ठरू शकतात असं वाटत आहे. “सर्वात आश्चर्यकारक निकाल पश्चिम बंगालचे लागण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरण्याची दाट शक्यता आहे. बिहारमध्येही ते पहिल्या क्रमांकावर असतील. तिथे भाजपा जरी फक्त १७ जागा लढवत असले, तरी त्यांच्या निवडून येणाऱ्या खासदारांचं प्रमाण इतरांपेक्षा जास्त असेल”, असं प्रशांत किशोर म्हणाले आहेत.
घराणेशाही मोठी जबाबदारी!
दरम्यान याावेळी प्रशांत किशोर यांनी घराणेशाहीवरही भाष्य केलं. “एखाद्याच्या आडनावामुळे नेता बनल्यामुळे कदाचित स्वातंत्र्योत्तर काळात एखाद्या व्यक्तीला फायदा मिळाला असेल. पण आजच्या काळात ती एक मोठी जबाबदारी झाली आहे. मग ते राहुल गांधी असोत, अखिलेश यादव असोत किंवा तेजस्वी यादव. त्यांचा पक्ष आणि कार्यकर्त्यांनी कदाचित त्यांना नेते म्हणून स्वीकारलं असेल. पण या देशाच्या जनतेनं त्यांना नेता म्हणून स्वीकारलेलं नाही”, असं प्रशांत किशोर म्हणाले.