नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने आज दिल्लीत आपल्या सर्व निरीक्षकांसाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या बाबतीत एका महत्वाच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आयोगातर्फे उपस्थितांना निवडणूक प्रक्रिये विषयी ब्रिफिंग देण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या बैठकीला संबोधित केले.
२००० हून अधिक निरीक्षकांच्या बैठकीचे उद्दिष्ट निवडणुकीदरम्यान आदर्श संहितेची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी धोरण सुव्यवस्थित करणे हे होते. निवडणूक प्रक्रिया “मुक्त आणि निष्पक्ष” आहे याची खात्री करण्यासाठी निरीक्षक मतदान प्रक्रियेचे निरीक्षण करतील. निवडणुक गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी विविध विभागांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे.
दरम्यान, निवडणूक आयोग मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या शेवटच्या भेटीवर जाणार आहे. बुधवारी ही भेट संपल्यानंतर आयोग लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाने या आधी विविध राज्यांना भेटी दिल्या आहेत आणि प्रादेशिक पक्ष आणि उच्च सरकारी अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या आहेत. राज्यांच्या निवडणूक तयारीचे मूल्यांकन करण्यात आले आहे.