Jarange on Fadnavis । मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे अंतरवाली सराटीमध्ये काल दुपारी प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसून आले. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करतायेत. त्यांना माझा बळी हवा आहे असा खळबळजनक आरोप जरांगे यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी मुंबईकडे कूच केली होती. मात्र आज त्यांनी त्यांचा निर्णय मागे घेतला असल्याचे सांगण्यात येतंय.
“संचारबंदी का लावली? कारण काय? Jarange on Fadnavis ।
दरम्यान, आज सकाळी भांबेरी गावातून परत त्यांच्या अंतरवली सराटी या गावी परताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले. यावेळी बोलताना “संचारबंदी का लावली? कारण काय? अंबड तालुक्यात संचारबंदी लावली म्हणजे आम्हाला मुंबईत येऊ द्यायच नाहीय. फडणवीसांनी रात्री बंदुकीची फोटो टाकला. दम होता तर थांबायच, आम्हाला येऊ द्यायच नाही. हा प्रयोग रात्रीच होणार होता. मराठ्यांनी डाव यशस्वी होऊ दिला नाही. असे त्यांनी म्हटले.
पुढे फडणवीसांवर आरोप करताना, “मी बघणार त्याच्याकडे. तुम्ही शांत रहा. त्याच्यात किती दम होता, मला माहितीय. सग्या सोयऱ्याची अमलबजावणी करावीच लागेल. याचा परिणाम मराठ्यातच नाही, सगळ्या जाती-धर्मात होणार. फडणवीसांविषयी नाराजीची लाट उसळणार. आजच्या आज सग्या सोयऱ्याची अमलबजावणी करा. तुझ्याशिवाय कलेक्टर संचारबंदीचा आदेश काढू शकत नाही. असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, ”आता विचार करुन पुढच पाऊल टाकाव लागणार. त्याचा रात्रीचा डाव मोडला. आपण सगळ्यांना एकविचाराने पुढे जावं लागेल. महिलांवर रात्री हात उचलायला लावणार होता. राज्यकर्त्यांना हे शोभत नाही” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
‘फडणवीसांनी लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये’ Jarange on Fadnavis ।
“तुझ्यात दम असेल, तर सागर बंगल्यावर ये. तुला जातीवर आव्हान केलं होतं. तू बामणाचा असला, तरी मी खानदानी मराठा आहे. अरे दम लागतो. घरात बसून मराठ्यांच्या जीवावर मोठा झाला. बघतो सत्ता कशी येते, दम लागतो. एक तासात सांगंतो, तो रात्रीच करणार होता. जनता काम केल्यावर आदर करते” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.त्यांनी मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असा इशारादेखील त्यांनी यावेळी दिला.