Manoj Jarange । मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे अंतरवाली सराटीमध्ये काल दुपारी प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसून आले. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करतायेत. त्यांना माझा बळी हवा आहे असा खळबळजनक आरोप जरांगे यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी मुंबईकडे कूच केली होती. मात्र आज त्यांनी त्यांचा निर्णय मागे घेतला असल्याचे सांगण्यात येतंय.
अंबड तालुक्यात संचार बंदी Manoj Jarange ।
काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला. त्यानंतर मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथून पायी प्रवास करत सागर बंगल्यावर जाण्यासाठी निघाले होते. त्यानंतर त्यांनी जालन्यातिला भांबेरी गावात मुक्कामी थांबले होते. दरम्यान आता जरांगेच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. त्याच पार्श्वभूमीवर अंबड तालुक्यात संचार बंदीचे आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा
“मराठा आंदोलनामागे शरद पवारांचा हात, पोलिसांवर दगडफेक करण्याचे आदेश जरांगेंचे” ; कोणी केले गंभीर आरोप
तालुक्यात संचार बंदी लागू करण्यात आल्याने आता भांबेरी गावातून परत त्यांच्या मूळगावी म्हणजे अंतरवाली याठिकाणी रवाना झाले आहेत. त्यासोबतच त्यांनी अंतरवाली इथे पोहचताच त्यांनी मराठा आंदोलकांना आपापल्या घरी पाठवले. कायद्याचे पालन करणार असून आपण उद्या पुढच्या निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले.
फडणवीसांना राज्यासह देशातून संपवणार Manoj Jarange ।
दरम्यान, या अगोदर त्यांनी आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत त्यांना आम्हाला मुंबईत येऊ द्यायचं नसेल म्हणून ही संचार बंदी लागू केल्याचा आरोप केला. तसेच आता फडणवीसांना राज्यासह देशातून संपवणार असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. तसेच फडणवीसांनी रात्री त्यांच्या सोशल मीडियावर बंदुकीचा फोटो शेअर केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.