नवी दिल्ली – स्वातंत्र्यानंतरचा हिमालयीन रेल्वेच्या सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेला भारतीय रेल्वेचा उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्प असून या ४८ किमी लांबीच्या बनिहाल-खारी-संबर-सांगलदान सेक्शनवर २० फेब्रुवारी रोजी रेल्वे सेवा सुरू करणार आहे. श्रीनगर ते कन्याकुमारीशी जोडण्याचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने वाटचाल करण्यातला हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगलदान येथून एका ट्रेनला डिजिटली हिरवा झेंडा दाखवून या विभागाचे उद्घाटन करतील, असे आत्ता जाहीर करण्यात आले आहे. मात्र, या संदर्भात अधिकृत दुजोरा मिळणे बाकी आहे. किमान १५,८६३ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला बनिहाल-खारी-संबर-सांगलदान सेक्शन रेल्वे ऑपरेशनसाठी पूर्णपणे तयार आहे आणि आता बारामुल्ला ते बनिहाल या विद्यमान रेल्वे सेवांचा विस्तार सांगलदानपर्यंत केला जाणार आहे.
सांगलदान हे रामबन जिल्ह्याच्या मुख्यालयाजवळचे एक शहर आहे. या नव्याने बांधलेल्या विभागात एकूण १६ पूल आहेत, ज्यात ११ मोठे, चार छोटे आणि एक रोड ओव्हरब्रिजचा समावेश आहे. या विभागातील ९० टक्क्यांहून अधिक रेल्वेमार्ग बोगद्यांमधून जातो.
मार्गाच्या ४८ किम४३ी.३७ किमी मार्ग बिगद्यांतून जातो. यामध्ये देशातील सर्वात लांब वाहतूक बोगदा टी-५० देखील समाविष्ट आहे. हा बोगदा १२.७७ किलोमीटर लांबीचा असून तो खारी-संबर विभागात आहे.
या प्रकल्पाच्या बारामुल्ला-श्रीनगर-बनिहाल-सांगलदान विभागावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचा विस्तार १८५.६६ रूट किलोमीटर (आरकेएम) पेक्षा जास्त आहे आणि त्यात १९ रेल्वे स्थानके आहेत.