बारामती (जळोची) : वरिष्ठांनी सांगितलेल्या नेत्याला अध्यक्ष केला तर.पक्ष चांगला. आम्ही अध्यक्ष झालो म्हणजे निव्वळ बेकार, यांनी पक्ष चोरला, अरे निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली आहे, विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. आम्ही आमची बाजू मांडली. जो व्हिप द्यायचा आहे तो आमच्या बरोबर आहे, उगीच आमची बदनामी का करता, म्हंजे आम्ही वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आम्हाला अध्यक्ष पद मिळालं असतं. काही झालं नसत पक्ष माझ्या ताब्यात आला असता, तुमच्या सख्ख्या भावाच्या पोटीच मी जन्माला आलो ना, त्यामुळे भावनिक होऊ नका, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना दिला आहे.
अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अनेक ठिकाणी त्यांच्या सभा देखील होणार आहेत. या सभेत बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. | Ajit Pawar on sharad pawar
यावेळी अजित पवार म्हणाले की, पंधरा वर्षात आम्हाला फोन नाही आता आम्हाला फोन येतो. विचारपूस केली जाते. पाणी कसं आहे, कसलं पाणी शेतीच पाणी की पिकाच पाणी नक्की कसलं पाणी काय काय आम्ही तुमच्यासाठी केलं आणि तुम्ही विसरून जाताय हे बरोबर नसल्याचे अजित पवार म्हणालेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी महायुती केली आहे. | Ajit Pawar on sharad pawar
बहुतेक महाराष्ट्रातले अध्यक्ष आपल्या सोबत आहेत. आम्ही पक्ष बदलतोय तर आमची बदनामी करतायत. काही जण नुसत बोलतात, माझ्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, पण तुम्ही काम तर केली पाहिजे भ्रष्टचार होणार कसा, काम करतो त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात, असे अजित पवार म्हणाले आहेत. | Ajit Pawar on sharad pawar