मुंबई – अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांची मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. दोघांनीही आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अशात सध्या हे जोडपे त्यांच्या इरावती कर्णिक लिखित ‘जर तरची गोष्ट’या नाटकामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अशात सोशल मीडियावर प्रियाने एक संताप व्यक्त करत पोस्ट शेअर केली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिया बापटने नाट्यगृहाची कचऱ्यामुळे झालेली दुरावस्थामुळे संताप व्यक्त केला आहे. तिने पोस्ट केली आहे की,’नाट्यगृह स्वच्छ ठेवणे ही प्रेक्षकांचीही जबाबदारी आहे. कचरा कचरापेटीत टाकावा, नाट्यगृहात नाही. ही साधी गोष्ट आपल्याला कधी कळणार?” असा सवालही तिने उपस्थित केला आहे, यापूर्वी प्रियाप्रमाणे आणखी काही मराठी कलाकारांनी देखील नाट्यगृहातील अस्वच्छतेबाबत पोस्ट शेअर केल्या होत्या.
दरम्यान, प्रिया बापटच्या या नव्या नाटकाबद्दल सांगायचं झालं, तर ‘जर तरची गोष्ट’च्या निमित्ताने अभिनेत्रीने जवळपास १० वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन केलं आहे. यामध्ये प्रियासह उमेश कामत, पल्लवी अजय व आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील यांनी केले आहे. ‘जर तरची गोष्ट’ या नाटकात प्रिया बापट, उमेश कामतसह आशुतोष गोखले, पल्लवी अजय हे कलाकारही असणार आहेत.