sanjay raut – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दुपारी अयोध्येतील राम जन्मभूमी येथे श्रीरामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली, अशात आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नाशिकमध्ये राज्यव्यापी महाधिवेशनादरम्यान शिवसेना नसती, तर अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठाच झाली नसती असं म्हणत मोदी सरकारवर टीका केली आहे.
नाशिक येथे सातपूर परिसरातील डेमोक्रोसी हॉलमध्ये ठाकरे गटाचं राज्यव्यापी महाधिवेशन आज सुरु आहे. यावेळी संजय राऊत भाषणादरम्यान म्हणाले, ‘संपूर्ण देशातील वातावरण राममय झालंय.
त्यात उध्दव ठाकरे यांनी ज्योत पेटवली. श्रीरामासोबत शिवसेनेचं जुनं नातं आहे, आज शिवसेना नसती तर अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झालीच नसती. शिवसेनेचे वाघ तिकडे पोहोचले. म्हणून काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिकडे जाऊन प्राण प्रतिष्ठापना करता आली.’
राऊत पुढे म्हणाले,’काही लोक म्हणतात, रामाशी आमचं नातं नाही. जिथे हे अधिवेशन होत आहे ते धर्मक्षेत्र आहे. कुरुक्षेत्र आहे, कारण इथून आपण लढाई सुरू केली होती. आम्ही काय कुणाचे खातो, जे आम्हाला देतो. हे धर्मक्षेत्र आहे….लढाई आपण कुरुक्षेत्रातून सुरू करणार आहोत’ असेही संजय राऊत म्हणाले.