Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पावले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवार (sharad Pawar) यांनी केला असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले आहे. शरद पवारांना मराठा समाजाला कधी आरक्षण द्यायचेचं नव्हते. स्वत:च्या नेतेपदासाठी शरद पवारांनी समाजांना झुंझवत ठेवल्याचा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.
दर्म्य, सुप्रिया सुळे यांनी मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? असे म्हटल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले. शरद पवार यांच्या मनात असतं तर त्यांनी मंडल आयोगाच्या वेळीच मराठा समाजाला आरक्षण दिले असते, मात्र तसे त्यांनी केले नाही, असे फडणवीस म्हणाले. त्यांना कधी मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हतं. त्यांना फक्त दोन समाजाला झुंझवत ठेवायचे होते असे म्हणत फडणवीसांनी शरद पवारांवर निशाणा साधला.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी,”महाराष्ट्रात ज्यावेळी आपलं सरकर होतं त्यावेळी आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. ते सर्वोच्च न्यायालयात आपल्या सरकारच्या काळत टिकपलं होतं अस फडणवीस म्हणाले. आत्तासुद्दा आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मात्र, हे आरक्षण देताना ओबीसींवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. काहीही झालं तरी चालेल “असे फडणवीस म्हणाले. त्यांच्या आरक्षणावर संकट येणार नाही हे भाजपचे आश्वासन असल्याचे फडणवीस यांनी यावेळी म्हटले.
विरोधी पक्षांना देशाची, समाजाची चिंता नाही तर त्यांना त्यांच्या परिवाराची चिंता असल्याचे फडणवीस म्हणाले. आज आपण पाहत आहोत ते रोज भूमिका बदलत असल्याचे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना फक्त सत्तेच्या राजकारणात आपलं अस्तित्व टिकवण्याची चिंता असल्याचे फडणवीस म्हणाले.