राजगुरूनगर –खेड तालुक्यात अनेक महिला व नागरिक शासनाच्या विविध योजनांपासून वंचित असल्याचा प्रकार नुकताच शिवसेनेनेच्या (ठाकरे गट) “होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमातून समोर आले आहे. नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन शासनाच्या विविध योजनांपासून आम्ही असे वंचित राहिलो अधिकारी आणि स्थनिक प्रतिनिधी यांनी कशी उत्तरे दिली याबाबत पाढा वाचला.
शिंदे-फडणवीस सरकारच्या बोलघेवड्या योजना आणि फसव्या भुलथापांचे पितळ उघडे पाडण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेने (ठाकरे गटा)च्या वतीने “होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रम आयोजन केले आहे त्याचाच एक भाग म्हणून खेड तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना शहर कार्यालय, राजगुरूनगर येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये तालुक्यातील आणि राजगुरूनगर शहरातील अनेक नागरिक सहभागी झाले होते त्यांनी शासनाच्या विविध योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत चर्चा केली, सरकारी योजनांचा भांडाफोड केला.
या कार्यक्रमाचा शुभारंभ पुणे जिल्हा महिला संघटिका विजया शिंदे, सहसंपर्कप्रमुख अशोक खांडेभराड उपस्थितीत झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबाजी काळे, खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार, शिवसेना नेते रामहरी आवटे, महिला आघाडी शहरप्रमुख उर्मिला सांडभोर, ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हा संघटक बाळासाहेब ताये, युवासेना युवाधिकारी मृण्मय काळे, शहर प्रमुख संतोष राक्षे, ,युवा सेना चिटणीस अभय डांगले,
उपविभागप्रमुख राहुल मलघे, कविता गिलबिले, मंगल सोनवणे, शाखाप्रमुख स्वप्निल राक्षे, गणेश टाकळकर, संतोष टाकळकर, बाबा इनामदार, अशोक वाळुंज, विनायक अंकुश, निलेश वाघमारे, बाळासाहेब येवले, संजय कोकणे, शेतकरी सेना एल. बी.तनपुरे, बाळासाहेब गारगोटे यांच्यासह तालुक्यातील व नागरिक उपस्थित होते.
समस्यांचा वाचला पाढा
या कार्यक्रमात अनेक नागरिकांनी शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, परितक्ता, श्रावणबाळ योजना, रमाई शबरी घरकुल योजना,विशेष घटक योजना, वैयक्तिक लाभाच्या योजना, नैसर्गिक आपत्ती नुकसानभरपाई आदी योजनांबाबत बाबत समस्यांचा पाढा वाचला.