नगर – यंदाचा गळीत हंगाम संपुष्ठात येऊन 15 ते 20 दिवसांचा कालावधी झाला तरी अद्यापही नगर जिल्ह्यातील 14 सहकारी साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची देणी थकली आहे. तब्बल 245 कोटी 22 लाख 35 हजार रुपये एफआरपी थकली आहे. सध्या ऊसाचे पैसे न मिळालेले शेतकरी कारखान्यासह प्रादेशिक साखर उपसंचालक कार्यालयात खेट्या मारीत आहेत. त्यात प्रामुख्याने अशोक, विखे, नागवडे, केदारेश्वर व साईकृपा या कारखान्यांकडे मोठी एफआरपी थकली आहे. या कारखान्यांनी शेतकऱ्यांची देणी तातडीने द्यावी, अशा आशयाची नोटिस साखर उपसंचालक कार्यालयाने बजावली आहे.
उसाचे क्षेत्र कमी असल्याने यंदा गाळपाला कमी ऊस उपलब्ध झाला असून सर्व कारखान्यांचा हंगाम देखील मार्चमध्ये संपला होता. उसाच्या टंचाईमुळे कारखान्यांच्या गाळपावर त्याचा परिणाम होत आहे. जिल्ह्यात सहकारी व खासगी असे तेवीस कारखाने असून, या हंगामात सर्वच कारखाने सुरू झाले आहेत. सहकारी व खासगी कारखान्यांनी या हंगामात 124 लाख 89 हजार 924 मेट्रीक टन ऊसाचे गाळप झाले असून त्यापासून 120 लाख 60 हजार 483 क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. बहुतांशी कारखाने 25 मार्चच्या दरम्यान बंद झाले आहेत.
या हंगामात घुले पाटील, गणेश, काळे, थोरात, कोल्हे, अंबालिका, पियुश या सात कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिली आहे. मात्र उर्वरित 14 कारखान्यांकडून शेतकऱ्यांना ऊसाचे पेमेंट अद्यापही झालेले नाही. तब्बल 245 कोटी 22 लाख 35 हजार रुपये एफआरपी थकली आहे. या हंगामात 3 हजार 552 कोटी 98 लाख 83 हजार रुपये एफआरपीची रक्कम होत असून त्यापैकी 2 हजार 457 कोटी 87 लाख 52 हजार रुपये शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांची देणी रखडल्याने शेतकरी संघटना आता आक्रमक झाल्या आहेत.
कारखान्यांकडे थकीत ‘एफआरपी’ पुढीलप्रमाणे –
अगस्तीः 10 कोटी 17 लाख 92 हजार
अशोकः 30 कोटी 29 लाख 29 हजार
जगतापः 36 कोटी 22 लाख 86 हजार
प्रसाद शुगरः 6 कोटी 61 लाख
विखेः 15 कोटी 29 लाख 78 हजार
नागवडेः 14 कोटी 96 लाख 22 हजार
मुळाः 1 कोटी 53 लाख 54 हजार
वृद्धश्वेरः 28 कोटी 14 लाख 49 हजार
केदारेश्वरः 32 कोटी 7 लाख 33 हजार
साजन शुगरः 3 कोटी 9 लाख 87 हजार
जयश्रीरामः 3 कोटी 12 लाख 9 हजार
गंगामाईः 36 कोटी 38 लाख 46 हजार
क्रांती शुगरः 1 कोटी 88 लाख 40 हजार
युटेकः 10 कोटी 86 लाख 65 हजार
साईकुपाः1 4 कोटी 64 लाख 47 लाख