नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधींना किमान शिक्षा व्हायला हवी होती, राहुल गांधी यांना शिक्षा करण्यापूर्वी त्याच्या कुटुंबाची पार्श्वभूमी बघायला हवी होती. असे अजब विधान काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी केले आहे. त्यांचे हे विधान सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.
प्रमोद तिवारी म्हणाले,’राहुलला कमीत कमी शिक्षा द्यायला हवी होती राहुल गांधींच्या कुटुंबीयांसाठी कायदा हा शिक्षेत वेगळा असला पाहिजे, पण दोषसिद्धीत नाही. जेव्हा तुम्ही गुन्हेगाराला दोषी ठरवता तेव्हा कोणत्याही गोष्टीकडे पाहू नका, परंतु जेव्हा तुम्ही शिक्षा देता तेव्हा तुम्ही त्याच्या कुटुंबाकडे पहा. शिक्षा देण्यापूर्वी राहुल गांधींच्या कुटुंबाचा एकदा विचार करायला हवा होता. असेही ते म्हणाले आहे.
दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मानहानीच्या खटल्यात दोषी सिद्ध झाल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्यांच्यावरील झालेल्या या कारवाईने संपूर्ण राजकारण ढवळून निघाले आहे. सर्व विरोधी पक्षाकडून आंदोलन करत या कारवाईचा निषेध करण्यात आला आहे.