पुणे -महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या ( एमएसआरडीसी) रिंगरोड प्रकल्पातील बाधित गावांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून गावनिहाय सुनावणी प्रक्रियेद्वारे भूसंपादनाला सुरुवात केली आहे. जानेवारीपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून त्यानंतर प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू करणार असल्याचे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले.
रस्ते महामंडळाने 172 किलोमीटर लांबीचा रिंगरोड प्रकल्प हाती घेतला आहे. पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग केले आहेत. पूर्व भागात मावळातील 11 , खेडमधील 12, हवेलीतील 15, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांचा समावेश आहे, तर भोरमधील पाच, हवेलीतील 11, मुळशीतील 15, मावळातील सहा गावांचा समावेश आहेत. 695 हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे.